महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

पाण्याच्या शोधत दोन काळविटांचा विहिरीत पडून मृत्यू ; जळगाव मजरा येथील घटना

पाण्याच्या शोधत दोन काळविटांचा विहिरीत पडून मृत्यू ; जळगाव मजरा येथील घटना
---------------  

गेवराई (प्रतिनिधी) : संपुर्ण जून महिना लोटला तरी गेवराई तालुक्यात पेरण्यायोग्य ही पाऊस न झाल्याने वन्य जीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याच्या शोधात भटकंती करत असतांना दोन काळविट विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जळगाव शिवारात शुक्रवारी रात्री घडली. दरम्यान ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जवळगाव शिवारात विहीरीत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दोन काळविट पडले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर गावचे पोलीस पाटील बाबासाहेब खुणे यांनी वनविभागाचे वनपाल टाकणकर यांना याची माहिती दिली. वन पाल यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता . दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढण्यासाठी श्रीमंतयोगी ग्रुपचे सर्वसदस्य , गोविंद बाबासाहेब खुणे , सरपंच पिंटूभाऊ , झुंबर इदगे , शहाजी इदगे , रखमाजी मोरे , कृष्णा इदगे , कुंडलीक खुणे , सुर्यभान खुने यांनी परिश्रम घेतले.