महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे यांना दिल्ली येथे अटक

बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे यांना दिल्ली येथे अटक
गेवराई (वार्ताहर )केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी आणि नेते मा. राहुलजी गांधी यांचा आवाज दडपू पाहणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात व देशाच्या तरुणांच्या बरबादीचा रोडमॅप असलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसेच्या वतीने खा.रजनीताई पाटील साहेब याच्या मार्गदर्शन खाली दिल्ली येथील आंदोलन करण्यात आले.
त्या नंतर बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी ह्यांना आई.पी.इस्टेट दिल्ली पोलिसांन कड़ून अटक झाली असुन,महाराष्ट्रातील ॲड श्रीनिवास बेदरे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव बंटी भाई शेळके,अभय देशमुख,सागर नागरे,वरून पथरीकर या सर्व पदाधिकारी आणि कार्यकरत्यांची सूटका झाली असुन, हा संघर्ष राहुल गांधी ह्यांच्या समर्थनार्थ आणि जो पर्यंत अग्निपथ भर्ती योजना केंद्र सरकार परत घेत नाहीं तो पर्यंत असच सुरु राहील अशी बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे यांनी सांगितले आहे.