महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

बाजार तळावरील वादग्रस्त जागेत कुणीच बांधकाम करू नये . समाज बांधवांचे प्रशासनाला निवेदन

बाजार तळावरील वादग्रस्त जागेत कुणीच बांधकाम करू नये . समाज बांधवांचे प्रशासनाला निवेदन
------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) शहरातील बाजार तळावर गायरान असलेल्या वादग्रस्त  जमिनीवर हिंदू - मुस्लिम समाजाने मंदिर-मज्जिद काहीच बांधकाम करू नये यासाठी आज समाज बांधवांनी एकत्र येत प्रशासनाला निवेदन दिले.

गेवराई शहरातील बाजार तळावर पोलीस स्टेशनच्या उत्तर बाजूस सावता नगर- इस्लामपुरा रोडवर पूर्वीची शासकीय गायरान असून याठिकाणी पूर्वीपासून बाजार भरण्यासाठी ही जागा प्रशासनाने नियोजित केलेली आहे. मात्र या शासकीय गायरान जमिनीवर जुनी गढी असून या जागेवर काही हिंदू व मुस्लिम बांधवांकडून दावा करण्यात येत असून मंदिर व मज्जिद बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत माहिती मिळताच शहरातील  या परिसरातील काही समाज बांधवांनी एकत्र येत या जागेवर कुठल्याच समाज बांधवानी हिंदू व मुस्लिम बांधवात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये यासाठी आज सकाळपासून मोठ्याप्रमाणात  समाज बंधावांनी एकत्र येत प्रशासनाला निवेदन देऊन शांततेचे आवाहन केले आहे.