महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु- इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु
-----------------------------------
इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग


शुभम घोडके

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.    सोमवार ता. 28 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरू झाले असून, ता. 18डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे नेत्यांनी आपले गट मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. विषेशत :राजकीय सोईसाठी हात मिळवणी करणारी नेते आता ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी भर देताना दिसत आहेत. त्यातूनच त्यांचा पुढे जिल्हा परिषदेपासून ते विधानसभेसाठी मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे ही निवडणुक ग्रामपंचायतीची असली तरी झलक विधानसभेची असल्याचे बघायला मिळणार आहे. सरपंचपदी निवडणूक जनतेतून करण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सद्यस्थितीत गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (ठाकरे गट) यांची स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे.
राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले आहे. गावातील कार्यकर्त्यांना पाठबळ दिले तरच ते पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणूकीत त्यांना मदत करणार आहेत. त्यामुळे या नेत्यांकडून आपल्या गटाचे पॅनल तयार करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.थंडीत राजकीय वातावरण तापले पॅनल प्रमुख विश्वासू कार्यकर्ता राहील, यांची काळजी घेतली जात आहे. राखीव प्रवर्गातून सक्षम उमेदवार शोधताना अनेकांना अडचणी येत आहेत. गावागावांतून पॅनल उभारणीसाठी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरु आहेत. त्यामुळे ऐन थंडीच्या काळातही राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षाशिवाय स्थानिक आघाड्या, अपक्ष यांचा मोठा भरणा यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत बघायला मिळेल, असेही संकेत जाणकारांनी मांडले आहेत.