महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेने नागरीकांची विश्वासाहर्ता जपण्याचे काम केले असून त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे - माजी आ. अमरसिंह पंडित

जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेने नागरीकांची विश्वासाहर्ता जपण्याचे काम केले असून त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे - माजी आ. अमरसिंह पंडित
------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी ) 
अनेक पतसंस्था या वर्धापन दिन हा आपल्या कार्याचे व आपण पतसंस्थेसाठी उभा केलेला निधी व भागभांडवल यांचे डफडे वाजवण्यासाठी करतात परंतु आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे विसरुन जात आहेत. परंतु जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक भावनेतून केले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.
 रविवार दि.१७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गेवराईच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, मस्के आबा, दादासाहेब घोडके, पतसंस्थेचे अध्यक्ष शिवनाथ मस्के आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना माजी आ.अमरसिंह पंडित म्हणाले की, सामान्य कुटुंबात जन्माला येऊन शिवनाथ मस्के सारख्या धडपड्या युवकांनी अल्पावधीत बँकींग क्षेत्रांमध्ये आपले नाव लौकिक केले असून गरजूंना कर्ज वाटप करून त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्याचे काम त्यांनी केले आहे. जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन अवघे ६ वर्ष झाले अाहे. या संस्थेने कमी दिवसात आपले नाव लौकिक केले असून या पतसंस्थेने ६ वर्षात १४ कोटी ठेवी करून ११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ६ वर्ष नफ्यात अॅडीट वर्ग अ मध्ये काम केले आहे. कोरोना या विषाणुजन्य परिस्थितीत ही जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेने मदतीचा हात पुढे करून या अनाथ मुलांना किराणा साहित्य दिले त्याच प्रमाणे पाच गरजवंत विधवा महिला शोधून त्या महिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी दोन हजार रूपये या पतसंस्थेकडून देण्यात येते ही सर्व कार्य समाज हिताचे व कौतुकास्पद आहे. काही पतसंस्था या वर्धापन दिनी आपल्या भाग भांडवलाचा गाजा वाजा करुन स्वतः तोंडाने आपलीच स्तुती करुन डफडे वाजवण्याचे काम करतात परंतु सामाजिक कार्य शुन्य पाहिला मिळते. तसेच तालुक्यातील अनेक पतसंस्था गरजु नागरिकांना कमी जास्त व्याजाने पैसे देवून नागरीकांना लुटण्याचे काम करतात त्यामुळे काही संस्था या पाटीवर नावालाच राहिल्या असून कार्यालयास मात्र कुलूप दिसते. त्यामुळे या मध्ये चढा ओढ न करता समान टक्केवारी नुकसान गरजूंना कर्ज वाटप करुन या बरोबरच सामाजिक कार्य करण्याची आवश्यकता असून यामध्ये जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था ही सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे मत शेवटी बोलताना व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.बाबु वादे यांनी केले. त्यांनी प्रास्वाविकपर भाषणात संस्थेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष राम कु-हाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शिवनाथ मस्के, राम कु-हाडे, प्रा.बाबु वादे, , भगवान आंतरकर, कैलास मस्के, श्रीमती संगिता कु-हाडे, श्रीमती संगिता वादे, रवि काळे आदीसह सर्व बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.