अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नाने अंतरवलीच्या शेतकऱ्यांना मिळाले*
एक कोटी पंचवीस लाख रुपयाचे अनुदान
=================
गेवराई दि. २२ (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील अंतरवली बु. येथील शेतकऱ्यांच्या एक वर्षापासून रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून अंतरवलीच्या शेतकऱ्यांना एक कोटी पंचवीस लाख रुपयाचे अनुदान मिळाले आहे. अनुदानाचा धनादेश तलाठी सुलाखे यांनी तलवाडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दाखल केला असून अंतरवली येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत. अंतरवाली येथील उपसरपंच किरण पंडितराव वावरे यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले .
शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी पुढाकार घेऊन काम करणारे आणि त्यांच्या समस्या निवारणासाठी सदैव धावून येणारे गेवराई तालुक्याचे लोकप्रिय नेते अमरसिंह पंडित यांनी अंतरवली येथील शेतकऱ्यांचा एक वर्षापासून रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला आहे. गेल्या एक वर्षापासून येथील शेतकऱ्यांचे एक कोटी पंचवीस लाख रुपयाचे अनुदान रखडले होते. त्यांमुळे शेतकरी अडचणीत आले होते. या अनुदानाचा प्रश्न सोडवण्याची मागणी अंतरवली येथील उपसरपंच किरण पंडितराव वावरे यांनी अमरसिंह पंडित यांच्याकडे केली होती, याची दखल घेत अमरसिंह पंडित यांनी पाठपुरावा करुन हा प्रश्न सोडवला त्यामुळे या सणासुदीच्या काळात शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे.
अमरसिंह पंडित यांच्या पक्षविरहीत कार्यप्रणालीमुळे गेवराई तालुक्यातील शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची उकल होत आहे. सता असो नसो सदैव काम करत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते नेहमी सक्रीय असतात, त्यामुळेच एक वर्षापासून रखडलेला अंतरवलीच्या शेतकऱ्याच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकरी वर्गात आनंद साजरा केला जात आहे. अंतरवलीचे उपसरपंच किरण पंडितराव वावरे, सरपंच दिपक उमप, सुरेश वावरे, कृष्णा बापू वावरे, अंकुश वावरे, अजिंक्य वावरे, डॉ. अरविंद जाधव, बबन वावरे यांच्यासह समस्त आंतरवली बु. गावकऱ्यांच्या वतीने अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.