महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

सात्रळ कन्या विद्यालयात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना; मतदान जनजागृतीचाही संदेश

सात्रळ कन्या विद्यालयात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना; मतदान जनजागृतीचाही संदेश


सात्रळ प्रतिनिधी 

सात्रळ कन्या विद्यालयात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना; मतदान जनजागृतीचाही संदेश
सात्रळ येथील श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयात इयत्ता दहावी (ब) वर्गातील विद्यार्थिनींच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन स्थापना करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि मतदानाचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या निवडणुकीत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्या ब्राह्मणे मॅडम यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी मंत्रिमंडळाचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री पाटील सर यांनी विद्यार्थी मंत्रिमंडळाची रचना, विविध मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या, लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी नेतृत्वगुण कसे विकसित करावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदी समीक्षा गागरे, उपमुख्यमंत्रीपदी अर्पिता भोसले, शिस्त मंत्री हेतल चिंतामणी, आरोग्य मंत्री राजलक्ष्मी राऊत, अभ्यास मंत्री जोया शेख, अर्थ मंत्री अंकिता खाडे, स्वच्छता मंत्री मीनाक्षी शिंदे, सांस्कृतिक मंत्री अनुष्का कोल्हे आणि क्रीडा मंत्री म्हणून विद्या पारखे यांची निवड झाली.
या निवडणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे राजलक्ष्मी राऊत यांची सलग तिसऱ्यांदा आरोग्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे.
हा उपक्रम विद्यालयातील शिक्षक श्री स्वप्निल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींना मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व पटवून देत, "मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. भविष्यात सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान करावे तसेच आपल्या आई-वडील व नातेवाईकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे," असे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती करण्यात आली.
नवनिर्वाचित विद्यार्थिनींचा सत्कार करताना श्री अरुण जोंधळे सर, श्री सचिन पलघडमल सर आणि श्री सागर ठोसर सर उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचे पालक श्री गोसावी बी. बी. यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि मतदानाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला.