महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

सुषमा मोरगांवकर - स्त्रीत्वाचा गौरव

सुषमा मोरगांवकर - स्त्रीत्वाचा गौरव 

     समाजसेवेचा वसा घेतलेली अनेक माणसे आपण पहात आलोय, अशी भली माणस आपल संपूर्ण आयुष्य समर्पित करून, समाजाचा घटक म्हणून उत्तरदायित्व पार पाडतात. खर म्हणजे, हे कार्य तसे अवघड असते. 
त्यासाठी, मनाची तयारी असावी लागते. फातिमा बी, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचलय. त्यांच्याच पाऊल वाटेवरून एका शिक्षिकेने, स्त्रीत्वाचा गौरव वाढविला आहे. निरागस बालकांना आकार देऊन संस्कारक्षम केलय. हे   दायित्व पार पाडताना त्यांनी खूप कष्ट उपसलेत. सलग चौदा वर्ष सेवेत राहून, एक रुपया ही पगाराची अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांच्या मनात "ज्ञानदीप" लावलाय. एखाद्या परिकथेतील गोष्ट वाटावी, असा त्यांचा प्रवास राहीला आहे. एका अर्थाने, त्यांची सेवा म्हणजे परीसस्पर्श ठरावा.
वीस वर्ष झाली. त्या, मराठवाडय़ाची शिक्षण पंढरी म्हणून ओळख असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या, श्री चिंतेश्वर विद्यालयात बालवाडी शिक्षिका ते माध्यमिक शाळा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुलगुरू शिवाजीराव भोसले सांगायचे, शिक्षणाच्या व्यासपीठावर स्त्रीत्वाला वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल, मात्र त्यासाठी, लहान मुला - मुलींच्या वाट्याला "चांगल्या बाई" यायला हव्यात. कारण, ही लहान मुल शाळाच चुकवत नाहीत. या अर्थाने, सुषमा सूर्यकांत मोरगांवकर यांनी, संस्कार केंद्र प्रमुख (मुख्याध्यापक) म्हणून ओळख निर्माण करून, शैक्षणिक कर्तव्य पार पाडले आहे. आदर्श पत्नी, मुलांची आई, आई - बाबांची ताई, सासूबाईंची आवडती केतकी आणि विद्यार्थ्यांच्या आवडत्या "बाई" म्हणून लोकप्रिय झालेल्या सुषमा ताईंच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा.संस्थेने शहरातल्या (गेवराई-बीड) मोटे गल्लीत शाळा सुरू केल्यावर, 
अनुभव नव्हता, सुरूवात अडखळत झाली. त्यांचे पती शारदा शाळेत गणिताचे शिक्षक, मग त्यांनीच या अंगणवाडीतल्या नवख्या बाईला मार्गदर्शन केले. खंबीर पाठींबा दिला. बळ दिले. एक रूपया ही मानधन मिळत नसताना, या माऊलीने किती वर्ष ज्ञानदान केले ? जवळपास चौदा वर्ष...! त्यांच बीएड झाल..1994 साली. सन 2000 सालात त्यांना बालवाडी शिक्षिका म्हणून संधी मिळाली.ही माऊली निरागस मुलांच्या हितासाठी, समाजसेवा हा उद्देश ठेवून बालवाडीओअया शिक्षिका झाल्या. कसलीही अपेक्षा नाही. असली तरी त्याचा काहीएक उपयोग झाला नसता. कारण, बालवाडी विना अनुदानित तत्वावर सुरू झाली होती. पगार किती ? तुम्ही विचारायचे नाही आणि आपण सांगायचे नाही. झाकली मूठ....सव्वालाखाची. कामात राम शोधला की, मानधनाचे काही वाटत ही नाही. 
   संवेदनशील, हळव्या, प्रमाणिक 
आणि कर्तव्य कठोर शिक्षिका म्हणून त्यांच कर्तृत्व त्यांनीच सिद्ध केलय. त्यामुळेच ,त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत.आयुष्याचा पाठीराखा म्हणून उभा राहीलेला पती, त्यांनीच या चार हिताच्या गोष्टी पत्नीला सांगितल्या. तुला करायच तर मन लावून करा, पगार मिळणार नाही. पाहिजे तर माझ्या पगारातला अर्धा पगार तुझा. पण, येथे तुला काही मिळणार नाही. बघ, समाजसेवा म्हणून करणार असशील तर तुला नक्की मुलामुलींचे आशीर्वाद मिळतील  ?त्यांच तालासुरातले बडबड गीत मुलांना खूप आवडायचे, बाईनी वर्गाच्या बाहेर जाऊच नये, असा भाव बालकांचा असायचा. चिमुकल्या बाळांना एवढ्या त्या आवडायच्या. शहरात आणि खास करून घराजवळ असलेली शाळा पालकांना सुरक्षित वाटू लागली. बाई सुद्धा ,आपल्या मुलांना
जीव लावून चांगले शिकवत 
असल्याचे पालकांच्या लक्षात आलेच होते. त्यामुळे, शाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. वर्ग वाढ होत होती. संस्था आणि सुषमा ताईंना
आनंद वाटू लागला. मात्र, एका वर्षी ताईंची चांगलीच तारांबळ उडाली. त्याचे झाले असे की, वर्ग वाढ करण्यासाठी त्यांनी शिक्षण विभागाला अर्ज केला. परंतू , त्यावर काही निर्णय होईना. त्या वैतागल्या. सलक तीन दिवस शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवले. सकाळी उठणे, कार्यालयीन वेळेत बीडला जायच्या, दिवसभर झाडाखाली बसायच्या. अधिकारी यायचे आणि थांबा म्हणायचे. काय करावे कळेना. फाईलवर सहीच होत नव्हती. अक्षरश: दिवसभर शाळेत आणि रात्री आईच्या घरी मुक्काम करायची वेळ आली. त्याच वेळी लहान मुलगा आजारी पडला. 
वर्ग वाढीकडे दुर्लक्ष केले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल की काय, अशी चिंता वाटू लागल्याने,  मोरगांवकर यांनी जेष्ठ पत्रकार सतीश पत्की सरांना समस्या सांगितली आणि पाच मिनिटात वर्ग वाढीचे पत्र त्यांच्या हाती आले.चिंतेश्वर विद्यालय, कष्टप्रद प्रयत्न करून उभे राहीले आहे. आधी बालवाडीची साधी खोली होती. त्यानंतर, संस्थेने स्वतःची जागा घेतली. आता, या जागेवर मनासारखी सुंदर इमारत उभी राहीली आहे.  संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , पालकांचा वाटा आहे. अनेक संकटे आली. शहरात घडलेल्या एका गंभीर घटनेने शाळेपुढे "यक्ष" प्रश्न उभा राहीला. पालक टीसी साठी येऊ लागले. अशा कठीण प्रसंगाला शिक्षकांनी समर्थपणे तोंड दिले. विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित ये-जा करता यावी म्हणून, शिक्षकांची साखळी तयार करून मोरगांवकर यांनी पालकांचा विश्वास संपादन केला. "ब्रेन ड्रेन" शाळेचे धोरण राहीले आहे. विद्यार्थी हित आणि तोच केन्द्र बिंदू, या न्यायाने विद्यार्थीच्या भविष्यासाठी, शाळेने नवनिर्माण क्षमतेला वाव मिळेल, अशी साखळी तयार केली. उदा. म्हणून, दोन वर्ष विना दप्तर शाळेचा प्रयोग, नाट्यमय परिपाठ घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे. शाळेचे अनेक गुणवंत विद्यार्थी 
  सुषमा ताईंच माहेर बीडचं, वडील श्री मोरगांवकर मिलिट्रीत होते. आई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आईच्या संस्कारात वाढलेल्या ताईंच शिक्षण चंपावती विद्यालय, सिद्धेश्वर महाविद्यालयात झालेले आहे. त्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र पदवी संपादन करून, शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांना या क्षेत्राची आवड ही होती. लग्नानंतर त्या बोर्डे कुटुबांची सून म्हणून गेवराई शहरात आल्या. पती शिक्षक म्हणून काम करत होते. 
    जाॅब चे वांदेच होते. आज ही आहेत. खिसा गरम असलेल्यांना नौकरी असायची. नसेल तर, नो...व्हॅकन्सी. 
ताईंना, भ्रष्टाचाराची कीड नकोशी वाटते. विशेषत: शिक्षणा सारख्या संस्कार केन्द्रात त्याचा लवलेश ही दिसू नये, या मतावर त्या ठाम दिसतात. म्हणून मग,  पैसे देऊन नौकरी करायच्या भानगडीत न पडता , गृहणी म्हणून चालत्या झाल्या. योगायोगाने, त्यांना संधी चालून आली. त्या संधीच त्यांनी सोन केले आहे. आजवरच्या प्रवासा विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, "बिन पगारी" नोकरीचा वेगळाच अनुभव असतो. ही गंभीर समस्या आहे.  शाळेत ज्ञानदान करणारे शिक्षक विना अनुदानित शाळेत कार्यरत असतात.  गरज ही असते. त्याच शाळेत, पगार  असलेले सहकारी असतात. नाही म्हणल तरी, मानसिक त्रास होतोच. हे मळभ जायला हवे, शिक्षकांना "समान वेतन" असावे. त्यांचा प्रश्न ऐरणीवर न राहता निकाली निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या मोरगांवकर यांच्यातले सजग नागरिकत्व प्रकट होत जाते. त्यांना गंभीर, करंट विषयाची पुस्तके वाचण्यांचा छंद जोपासला आहे. सुधा मूर्ती, रमाई, बाबा आमटे,नरेंद्र जाधव यांची पुस्तके वाचून काढली. त्या साहित्य रसिक तर आहेतच, त्यासोबत त्यांना लिहायला आवडते. शैक्षणिक
विषय त्यांच्या लेखाचे विषय राहीलेत. पंचकोश विकसन, या शैक्षणिक विषयावर त्यांनी शोध निबंध लिहून काढलाय. तो प्रसिद्ध ही झाला आहे. शैक्षणिक व्यासपीठावर शोध निबंधाचे खूप कौतुक झाले आहे. लाईफ इन्शुरन्सच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याबद्दल इंडिया बॅन्केने, त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. अशा या गुणी संस्कार केन्द्र प्रमुख म्हणून यश संपादन करणार्‍या सुषमा ताईंना मनापासून शुभेच्छा..! 

सुभाष सुतार 
( पत्रकार )