महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

वारकरी साहित्य परिषद चा अध्यक्ष विठ्ठल पाटील याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,गेवराई विश्वकर्मा वंशीय समाजाची मागणी

वारकरी  साहित्य परिषद चा अध्यक्ष विठ्ठल पाटील याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,गेवराई विश्वकर्मा वंशीय समाजाची मागणी

गेवराई ( प्रतिनिधी) 
विश्वकर्मा वंशीय समाजाची मागणी विश्वकर्मा समाजाचे आद्य संत भोजलींग काका यांच्याबद्दल आर्वाच्च भाषेत  बोलुन अवमान केल्याबद्दल विठ्ठल पाटील याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी गेवराई तालुक्यातील विश्वकर्मा समाजाने केली आहे.
सुतार समाजाचे वारकरी संप्रदायाचे आद्य संत भोजलींग काका यांच्याबाबत वारकरी साहित्य परिषदेचा स्वयंघोषीत अध्यक्ष विठ्ठल पाटील राहणार  ईमान धामणी तालुका  मीरज जि सांगली याने व
अतिशय खालच्या पातळीवर बोलुन स्वतःचा गाढव पणा सिद्ध करत निर्लज्ज पणाचा कळस गाठलेला आहे, या मुळे विश्वकर्मा समाजामधे  संतापजनक वातावरण निर्माण झाले असून लवकर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जर लवकरात लवकर  विठ्ठल पाटील याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा  लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . असे निवेदनात म्हटले आहे सदरील निवेदन गेवराई तहसीलदार यांना गेवराई तालुका विश्वकर्मा वंशीय  सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या  यांच्या नेतृत्वाखाली व  प्रदेश सचिव दिलीप सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आली या  यावेळी बाबासाहेब  सांगुळे, बाळासाहेब गायकवाड,सुनील  पोपळे, सय्यद सुभान भाई, नवनाथ सांगुळे, सुनील सांगळे,रवी पांडे,संतोष गायकवाड, आदिनाथ सांगुळे, गणेश निर्मळ,रोहीत गायकवाड, किशोर वाघमारे,अरुण  पवार, अनिल गायकवाड, बप्पासाहेब गायकवाड  यांच्यासह अनेक विश्वकर्मा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते