महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

तलावात बुडून गेवराई शहरातील तरुणाचा मृत्यू

तलावात बुडून गेवराई शहरातील तरुणाचा मृत्यू
----------------------------------------



गेवराई ( शुभम घोडके) शहरातील संजय नगर भागातील एक तरूण गोविंदवाडी तलावाजवळ असणाऱ्या एका दर्गाच्या पाया पडण्यासाठी गेला होता तसेच हातपाय धूताना त्यांचा तोल सुटला आणि तो तलावाच्या पाण्यात पडला व त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.१६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातील संजय नगर येथील अमर अजिस शेख (वय ३२ वर्ष ) हा तरूण गुरुवार दि.16 रोजी दुपारी तीनच्या सुमारास गेवराई शहरालगत असनाऱ्या गोविंदवाडी तलावाच्या शिवारात असलेल्या दर्गाच्या पाया पडण्यासाठी गेला होता. तो तलावाच्या काठावर हात पाय धुण्यासाठी गेला असताना त्यांचा पाण्यात तोल गेला असल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना अजू बाजुच्या नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची  माहिती पोलिसांना दिली गेवराई पोलिस घटनास्तळावर दाखल झाले तसेच मयत तरूणांचा मृत्यूदेह पाण्यातून बाहेर काढला असुन त्याला उत्तरीय तपासणीसाठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालायत आणला असुन या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती जमादार साजेद सिद्धीकी यांनी दिली आहे.