महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

किशोर नाना हंबर्डे,माजी विद्यार्थिनी कलेक्टर संगीता राठोड यांच्या हस्ते कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

किशोर नाना हंबर्डे,माजी विद्यार्थिनी कलेक्टर संगीता राठोड यांच्या हस्ते कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न                                 

आष्टी प्रतिनिधी  

 आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे आणि एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक गोविंदराव राठोड यांच्या सेवापुर्ती निमित्त उपस्थित त्यांची कन्या, महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कलेक्टर संगीता राठोड यांच्या हस्ते कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या अजून मारेकरी सापडत नाही या कवितासंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन थाटात संपन्न झाले.यावेळी  उपाध्यक्ष व्ही.एल.शिंदे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे,संचालक मंडळातील तय्यब सेठ,प्रा.महेश चवरे,तसेच उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले, कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,  प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी उपस्थित होते.कवी प्रा सय्यद अल्लाउद्दीन यांची आजवर झिंदाबाद..मुर्दाबाद, जमावबंदी,अंगठेबहाद्दर झिंदाबाद,बाप पिकवितो घास...त्याला गळफास,बबलू...  छबलू,आई तुझं लेकरू,आई माझी,  नातवांची आजी,दहशतवाद मुर्दाबाद,जरा याद करो कुर्बानी,उचल कोयता तोडीला, उंटावरची शाळा,बालाघाटची गाणी इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.काही पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्या प्रकाशित  झालेल्या आहेत.बालाघाटाची गाणी या बालकविता कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रख्यात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे.