महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

दारू गुटखा बंद करण्याची मानसिकता कोणत्याही राजकारण्यांमध्ये नाही: स्वातीताई मोराळे

दारू गुटखा बंद करण्याची मानसिकता कोणत्याही राजकारण्यांमध्ये नाही: स्वातीताई मोराळे
      
पुणे(प्रतिनिधी)  महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद होऊन सात आठ वर्षे झाली असतील परंतु सर्रास प्रत्येक गावात व प्रत्येक टपरीवर आजही खुले आम गुटखा विक्री केली जात आहे. जर सरकार कोरोना काळात संपूर्ण देश जाग्यावर ठप्प करु शकतो तर मग गुटखा विक्री कशी बंद होऊ शकत नाही?
      पुढाऱ्यांची हि मानसिकता कधीच बदलू शकणार नाही. नियम व कायदे बनवायचे परंतु त्यांची अमलबजावणी कधीच होऊ द्यायची नाही. बंदी घालायची व तीच वस्तू दहा पटीने अधिक किंमतीत उपलब्ध करून द्यायची व वरील मलीदा खायचा. उत्तर प्रदेश मध्ये एक गुटखा विक्रतेच्या घरी तीनशे कोटी पेक्षा जास्त संपत्ती सापडते, याला प्रशासन व पुढारी यांची साथ नक्कीच असणार आहे.
        वाईन दुकानात मिळणार या कायद्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाईनला दुकानात विक्रीला परवानगी द्यायची की नाही? यामुळे दारू पिणाऱ्याचे प्रमाण वाढेल का? आणि शेतकऱ्यांना याचा खरचं फायदा होईल का? याची उत्तरे शोधण्याच्या अगोदर दारू गुटखा बंदी पुढाऱ्यांना हवी आहे का हा खरा प्रश्न आहे. आणि दारू गुटखा बंद करण्याची मानसिकता कोणत्याही राजकारण्यांमध्ये नाही असे मला वाटते.
स्वातीताई मोराळे 
सामजिक कार्यकर्ती